Popular posts from this blog
ANSWER WRITING
स्पर्धापरीक्षांची विचारसरणी काय असते?
स्पर्धापरीक्षांची विचारसरणी काय असते? भारताच्या परीक्षा व्यवस्थेनं यशापेक्षा अपयशाचीच निर्मिती केली आहे. कोणत्याही स्पर्धात्मक स्वरूपाच्या परीक्षेमध्ये यश व अपयश अशा परस्परवर्जक वास्तवांचा समावेश असतो. स्पर्धात्मक पद्धतीमध्ये परीक्षेची मांडणी होत नाही तोवर त्या परीक्षेची तीव्रता वाढत नाही. नागरी सेवेसारख्या ‘डार्लिंग डेस्टिनेशन’ची सार्वजनिक प्रतिमा असलेल्या आणि वैद्यकीय, व्यवस्थापन व सॉफ्टवेअर अभियांत्रिकी यांसारख्या क्षेत्रांमध्ये इच्छुक उमेदवारांना पुढं नेणाऱ्या परीक्षा खरोखरच तीव्र स्वरूपाच्या असतात, असं विवाद्यरित्या म्हणता येईल. या रोजगाराच्या अत्युच्च मुक्कामांपर्यंत पोचण्यासाठीची आकांक्षा संबंधित इच्छुकांना लहानपणापासूनच स्पर्धेच्या कचाट्यात पकडण्याची शक्यता असते. या वैशिष्ट्यपूर्ण रोजगारस्थळांमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी या परीक्षा देणं आवश्यक असतं, त्यामुळं तिथल्या काही शे वा काही हजार जागांसाठी स्पर्धा करू पाहणारे प्रचंड संख्येनं उमेदवार स्वाभाविकपणे या परीक्षांकडं आकर्षित होतात. सर्वसाधारणतः परीक्षा या चाळणीसारख्या कार्यरत असतात आणि त्यातून यश कमी व अपयश अधिक...



Comments
Post a Comment